Posts

Showing posts from May, 2024

कविता

 #टास्ककविता तू कृष्ण मी राधा साथ तनामनाची  तुझ्यासवे सोबत संगत युगायुगांची बासरीच्या सुरांकडे राधा धुंद होऊनी  अलगद धावे वृंदावनी जिथे कृष्णमुरारी तनमनाचे भान हरपूनी सुरांत हरवूनी जाई वृंदावनी व्याकुळली राधा आता मुकुंदा नाही श्रीकृष्णाच्या नयनी पाणी हाती धरता पावा तुझ्या-माझ्यातील अंतर राधे सोसतसे मुरली तुझ्यासाठी वेणूचे सूर वृंदावनी स्थिरावले मुरलीच्या स्वरांना अर्थ होता केवळ तुझ्यासवे सोबतीला आहे मुरली तुझ्या स्मृती जागवण्या राधाकृष्णाची जोडी होण्या जगतवंद्य यज्ञकुंडात पडली आहुती राधे तुझ्या सहवासाची  माझ्या हृदयी वसली तेव्हा तुझीच केवळ मूर्ती  सोळा सहस्त्र नारी असुनी भवताली पण राधा का कृष्णासवे उभी हे न जाणे कुणी राधा कृष्ण पावा अन सूर जाणती याचे गमक तनामधील अंतर कोसांचे परि मने झाली एक तुझ्यामाझ्यातील अंतर सूक्ष्म एका रेषेचे कोण कृष्ण अन कोण राधा अवघे एकची झाले दुरावूनी ही कायमस्वरुपी एकमेकांचे झाले कृष्णचरणी रुतता काटा मुखी नाम राधेचे श्रीहरीच्या वेदनांना राधेनेच सहावे कुठले अंतर कसला दुरावा मैलोनमैल अंतरावरही राधा कृष्णाचीच अन कृष्णही फक्त राधेचाच कृष्...

परमानंद

 परमानंद  ©️सौ. हेमा पाटील.   दिस पार ग्येला ह्ये बगून संज्यानं बिगी बिगी बैलाच्या फुढ्यात मक्यान इसकाटलं आन् तितनं त्यानं थेट गावाचा रस्ता नाटला...कारन त्याला हरिपाठ सुरु हुन्याआदी पोचायचं हुतं...हरिपाठाची वेळ झाली हुती.   गावात दरसालासारखं यंदा बी ज्ञानेश्वरी पारायण बसलं हुतं. संज्या पारायणाला वाचायला बसायचा नाय, पन बालपनापास्नं मंदिरात हरिपाठाला जायाचा.त्यामुळं पारायणात टाळकरी म्हनून उभा रहायचा.रोज तिन्हीसांजंला प्रवचन असायचं,त्याला तो हजर असायचा,त्यामुळं तर लगबगीनं त्यानं गावाकडं धाव घ्येतली हुती.   कासुर्डे गावात पंचेचाळीस वरसांपास्नं  दरसाली पारायण बसतं.ल्हान असल्यापास्नं संज्या बगत आलाय.हरिपाठात ताल धरतच त्यो ल्हानाचा मोटा झाला हुता. पारायण काळात  .संज्याला दिसभर शेतीची कामं उरकायची असतेती, पर सांजचीपारा हरिपाठ व किर्तन आजपतुर त्यानं कंदीच चुकवलं न्हाई.त्यामुळंच त्याची शेतातनं गावाकडं परतायची लगबग चालली हुती. प्रवचन झालं, हरिपाठात तल्लीन होऊन एकसुरी पठण झालं..आता आज संतपंगत वरच्या आळीला हुती.टाळकरी सोबत्यांच्या संगं तो संत पंगतीला गेला.पारायण...

गारवा

 गारवा ©️सौ. हेमा पाटील.     बायकोने हातात आणून दिलेल्या चहाचे घुटके घेत तो आरामात टीव्हीवरील बातम्या पहात होता. सकाळीच  आवडीचा ब्रेकफास्ट मिळाल्याने जिव्हेचे व मनाचेही समाधान झाले होते, त्या समाधानाची दुलई ओढून तो अंमळ सुखावून टीव्हीसमोर बसला होता.    आतमध्ये बायकोची काहीतरी खुडबुड चालली होती. शक्यतो यावेळेपर्यंत दररोज तिची घरकामे उरकलेली असतात व दारात ऊभे राहून शेजारणीसोबत आपल्याला प्राप्त झालेल्या माहितीचे आदानप्रदान करणे अतिशय आवडीने चालू असते. पण आज अजूनही आतला आवाज थांबेना म्हणून त्याने विचारले, "काय करतेयस गं"...? यावर आतून काहीच आवाज आला नाही, तेव्हा तो उठून चहाचा कपही आत ठेवावा व प्रत्यक्षच तिचे काय चालले आहे ते पाहून येऊया असे म्हणत आत किचनमध्ये गेला. तर तांदूळ, साखरेचे डबे, हळदीकुंकवाच्या पुड्या, भस्म, अगरबत्ती, माचिस अन अजून काय काय सभोवती घेऊन ती बसली होती. त्याने विचारले, "हे काय"? यावर तिने फक्त हुं s केले. पण त्याला काहीच समजले नाही. त्याने चहाचा कप बेसीनजवळ ठेवला व पुन्हा तोच प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली, "दिसतेय ना... तुम्हांला काय मा...

मोगरा फुलला

 मोगरा फुलला  ©️सौ. हेमा पाटील. आपकीं नजरोंने समझा प्यार के काबिल हमें....हे गाणे सुरू झाले आणि मोहितने गाडी चालवताना निशाकडे हळूच पाहिले.ती ही तेव्हा त्याच्याकडेच पहात होती. आजची त्यांची दोघांची कांदेपोहे कार्यक्रमानंतरची पहिलीच भेट...गाडी लोणावळ्याच्या दिशेने चालली होती.गेल्याच आठवड्यात कांदेपोह्यांचा कार्यक्रम होऊन दोघांनी आपली पसंती दर्शवली होती.एकमेकांच्या सानिध्यात काही वेळ घालवावा व एकमेकांचा अधिक परिचय व्हावा, त्यानंतर पुढील निर्णय घ्यावेत अशा उद्देशाने आज ते दोघे लोणावळ्याला चालले होते.निशा अधूनमधून त्याच्याकडे कटाक्ष टाकत होती.मनाशी म्हणत होती, "छानच आहे हा..रुबाबदार! हं केस माथ्यावर विरळ होत आलेत,पण याच्या डोळ्यांत जो खरेपणा दिसतो तोच माझ्या मनाला सर्वात जास्त भावलाय.रंगरुपापेक्षा ही याचा स्वभाव कसा आहे हे तिला जास्त महत्वाचे वाटत होते.     तिने तिच्या आईवडिलांचा संसार सर्वात जवळून पाहिला होता.आईचे पतीला परमेश्वर मानणे आणि वडिलांनी मात्र बायको म्हणजे आपली कायमस्वरुपी दासी असे समजणे हे पाहून असेच पतीपत्नीचे नाते असते असाच तिचा बालपणी समज झाला होता.   ...

स्विकार

 स्विकार ©️सौ. हेमा पाटील.    आयुष्यात ना, स्विकारता आले पाहिजे.  एकदा स्विकारणे जमले, की आयुष्य खूप सोपे होऊन जाते.नाही पटत?...बरं ! स्विकारणे  जमले की  गोष्टी कशा सोप्या होतात हे सांगण्याचा प्रयत्न करते..बघा पटतेय का ! आमच्या बालपणी आजच्यासारखे मुलगा मुलगी एकसमान असे वातावरण नव्हते. आजही पूर्णपणे बदल झाला आहे अशातली गोष्ट नाही म्हणा..पण तेव्हा मुलाला प्रत्येक वेळी झुकते माप असायचे. हे डावललेपण स्विकारल्यामुळे पुढील आयुष्य खूप सोपे झाले. त्यामुळे  घरातील, कुटुंबातील आपल्या मानाच्या स्थानासाठी कधीच प्रयत्न करावासा वाटला नाही.जिथे आहोत तिथे कायमच समाधान मानले. त्यामुळे कधी कुणाशी भांडण, वाद करण्याची वेळ आली नाही.अर्थातच ते जमले ही नसते ही गोष्ट वेगळी! समोरची व्यक्ती कशी आहे , तिचे गुणदोष काय आहेत हे एकदा समजून घेतले आणि त्या गुणदोषांसकट त्या व्यक्तीला स्विकारले की एखाद्या प्रसंगी इतरांना जरी चुकीचे वाटले तरी ती व्यक्ती चुकतेय असे आपल्याला वाटतच नाही. कारण तिचे स्वभावदोष आपण जाणलेले असतात.ती अशीच वागणार हे आपण स्विकारलेले असते. मग यात कुणी स्वार्थी असते,...

रात्र थोडी सोंगे फार

 रात्र थोडी सोंगे फार... ©️सौ. हेमा पाटील. "तुझे तर काम असे असते ना..एक ना धड भाराभर चिंध्या"... "चिंध्या? आता या चिंध्या कुठून मध्येच आल्या? मला काय वेड लागलंय का कपडे फाडून चिंध्या करायला"? "अगं माझे आई..ही आपल्या मायबोलीतील म्हण आहे. नशीब मातृभाषेतूनच शिक्षण घेतले आहेस"... "हो हो..मी मराठी ! त्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात कसे सगळेजण छातीवर मूठ आपटून मी मराठी म्हणतात अगदी तसाच मलाही अभिमान आहे  मराठी असण्याचा". "उथळ पाण्याला खळखळाट फार".. "आता हे उथळ पाणी कशाला मध्ये आणलंत हो? त्याऐवजी कल्लुळाचं पाणी कशाला ढवळीलं.. नागाच्या पिल्ल्याला तू कशाला खवळीलं...हे गाणं भारी आहे"... "काय गं, तू खरंच डोक्यावर पडली आहेस का? उथळ पाण्याचा आणि या गीताचा अर्थाअर्थी संबंध तरी आहे का? आपली उचलली जीभ लावली टाळ्याला"... "अहो, मराठीचे प्राध्यापक...मला हेच कळत नाही जीभ टाळ्याला का लावायची? मी कुणालाच पाहिले नाही टाळा जीभ लावून उघडताना ..चावीनेच उघड बंद करताना पाहिलेय"... "अगं ऐ बाई..तो दरवाजाचा टाळा नाही गं ! आपल...

माझे बाबा

 आजचा अनुभव... सकाळी ध्यानाला बसले होते..बाबांची मूर्ती डोळ्यासमोर होती.बाबा म्हणाले, झाले का समाधान? आता आणखी काय ..यानंतर अजून काय..अजून काय ? यावर मी हसले.झाले समाधान बाबा.. तुम्ही सोबत आहात आणि कायमच सोबत रहा हीच अपेक्षा.. बाकीचे सगळे मिथ्य्या आहे हे समजलेले आहेच बाबा! पण तरीही या धारण केलेल्या मनुष्य देहालाही न्याय मिळायला हवा ना...खरं सांगू बाबा, त्या परिपूर्णतेच्या, मानवी इच्छा आकांक्षांच्या पूर्तीच्या वेळीही तुम्हीच आठवता. कारण सुरवात तर तुमच्यापासूनच झाली आहे. तुमची इच्छा नसेल तर झाडाचे पानही हलत नाही,मग बाकीचे काय सांगू... तुम्ही आहात... फक्त समाधीस्थळीच नाही , तर पूर्वी देहात असताना जसे सगळीकडे भ्रमण करायचात तसेच आजही करता.सगळीकडे तुम्ही आहात... फक्त तुमचे अस्तित्व ज्याला जाणवले तो भाग्यवान! अर्थात तुमचे अस्तित्व जाणवले नाही म्हणून भक्तांचे काही बिघडत नाही, तुम्ही आपल्या भक्तांवर अगदी बारकाईने लक्ष ठेवून असता.धनकवडीला जरी भक्त भेटायला आला नाही तरीही तुम्ही रागवत नाही, तुम्ही भक्तांची अडचण समजून घेता.उगाच तुमच्या चरणांशी लीन झालेला भक्त माझे बाबा अशी आर्त स्वरात साद घालत ...

परिवर्तन

 नमस्कार..माझी लेखणी वर आज प्रसिद्ध झालेली माझी कथा वाचा..खालील लिंक वर क्लिक करून... "सरिता..ऐ सरिता ! कुठल्या विचारात एवढी हरवली आहेस"? सरिताने भानावर येत स्वतःला सावरले, "अगं काही नाही गं असंच"... "नाही.काहीतरी मेजर आहे..गेले चारपाच दिवस मी पहातेय तुझे काहीतरी बिनसलेय.मिलिंदमध्ये अन् तुझ्यात काही वाद झाला आहे का? मी बोलू का मिलिंदशी"? "नाही गं..तसं काहीच नाही.जरा माझीच तब्येत बरी नाही". "काय गुड न्यूज देतेयस की काय"... यावर काहीच न बोलता सरिता कसनुसं हसली.दोघीही वेळ झाल्याने आपापले लेक्चर घेण्यासाठी आपापल्या क्लासरुमकडे गेल्या आणि तो विषय तेवढ्यावरच थांबला म्हणून सरिताला हायसे वाटले. सरिता शहरातील एका नामांकित काॅलेजमध्ये मराठीची प्राध्यापिका होती. मिलिंदचे व तिचे ॲरेंज मॅरेज होते.सुशिक्षित अन् वेलसेटल्ड फॅमिली असल्याने व मिलिंद एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजरच्या हुद्यावर असल्याने सरिताच्या कुटुंबातील सर्वांनी या स्थळाला पसंती दर्शवली होती. लग्नानंतर त्याच शहरात रहाणार असल्याने ती ही आनंदी होती. काही काळातच तिने मिलिंदच्या घरी गृहलक्ष्...

गझल रसग्रहण

  #गझलरसग्रहण सौ.हेमा पाटील  दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले थबकले न पाय तरी, हृदय मात्र थांबले वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली अन् माझि पायपीट डोळ्यांतून सांडली मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल विसरशील सर्व सर्व आपुले रोमांच पर्व पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल सहज कधी तू घरात लावशील सांजवात माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल                                    सुरेश भट कविवर्य सुरेश भट यांची ही गझल  प्रेमीयुगुलांची ताटातूट झाल्यानंतरची विरहाची अवस्था दर्शवतेय. प्रेमाबाबत काय बोलावे....आपल्या प्रिय सखी चे  दुसऱ्या कुणाशी लग्न झाले आहे ही गोष्ट स्विकारणे फार क्लेशकारक आहे. लग...

कोपराची कळ

 कोपराची कळ ©️सौ. हेमा पाटील. "अहो..हे काय? रवा आणलाच नाहीत तुम्ही! कसे तुमचे काम असते..एवढे निक्षून सांगितले होते तरीही विसरलात"!  "अगं नीट बघ.रवा आणलाय मी"! "कुठे? तो आणलाय तो जाड रवा आणलाय..तो उपम्यासाठी आणायला सांगितलाच होता, पण आदिला शिरा आवडतो म्हणून आवर्जून बारीक चमेली रवा आणायला सांगितला होता, तरीही विसरुन आलात". "रवाच आहे ना..याचा बनव शिरा". "त्याला प्रसादाचा शिरा असतो तसा दूध,केळ घालून बनवलेला शिरा आवडतो.विसरलात"? "हो गं..वय झाले हेच खरे! विसरलो खरं.. संध्याकाळी फिरायला जाईन तेव्हा आणतो.बाकी सामान बघ एकदा काही राहिले नाही ना"... माधुरी ताई आणि विठ्ठल रावांची गेले चार दिवस लगबग सुरू होती.दुधावरची साय सुट्टीला येणार होती.सुनबाई व मुलाने दरवर्षी प्रमाणे यंदाही में महिन्यात एका आठवड्याची सुट्टी घेतली होती व चार दिवसांत ते सगळेजण गावी येणार होते.माधुरीताईंना दरवर्षी प्रमाणेच काय करु अन् काय नको असे झाले होते.कालच त्यांनी घरघ़ंटीवर तांदूळ दळून घेतले होते. आदिला घावन व दूध फार आवडते म्हणून... थालीपीठासाठी भाजलेली धान्ये थं...

स्वामित्व

 जरा मनातलं बोलुयात या फेसबुक गृपच्या शब्दसुमने या विशेषांकात छापून आलेली ही माझ्या आध्यात्मिक लेखांहून सर्वस्वी वेगळी अशी लिहिलेली पहिलीच कथा... कुठल्याही पहिल्या गोष्टीचे कौतुक जास्त असते.तशी ही माझी आवडती कथा !धन्यवाद अंजुताई, वेगळे काही लिहिण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल 👍☺            स्वामित्व ©️सौ. हेमा पाटील.    विनी.. ऐ विनी! अजूनही आवरले नाही तुझे? किती बजावून सांगितले होते मी सकाळी, मी कंपनीतून निघताना फोन केला होता.. तरीही अजून तयार नाहीस?          बाथरुममधून डोक्याला टाॅवेल गुंडाळून विनी बाहेर पडली तर घरात रोहनचा दंगा सुरु होता. अरे, हो हो..! झालेच आहे सगळे! सगळी कामे आटोपून मगच मी बाथ घ्यायला गेले होते. आता माझ्या फ्रेश मूडला घालवू नकोस हं... चल, बॅगा गाडीत भरायला घे. मी तोपर्यंत एकदा घरात सगळीकडे चेक करते काही राहिले आहे का?     ती सगळीकडून चेक करत शेवटी देवघरात आली. तिथले मंद दिव्याचे बटन तिने सुरुच ठेवले व देवासमोर बसून तिने हळदीकुंकू वाहिले आणि स्वत:लाही हळदीकुंकू लावून घेतले. डोळ...

अडखळ

 अडखळ ©️ सौ.हेमा पाटील आजही  तिथेच आहे पाऊल माझे अडखळलेले.. वळून एकदा पाहशील तू, अशी आस आजही  दाटते... व्यवहार का नात्यात येतो, ना मला कधी कळले.. आठवाने तुझ्या आजही, हृदयी प्रीत  झंकारते.. वाट वेगळी तुझी नी माझी, परि तुझ्या सयीने चालते.. दूर असूनी आजही मी, सभोवती तुलाच शोधते.. कृष्ण माझा मोरपीशी , त्यास त्याच रंगात न्याहाळते.. मनी ठसलेल्या तव प्रतिमेसंगे, मी आयुष्य ओढते.. अप्राप्य तू  हे जाणते तरी, मन एका कटाक्षास आसुसले..  तृषार्त या नजरेत बघ, विरहाचे दुःख सामावले.. प्रकाशित करुनी वाटा जेव्हा,तुझी अबोल  वेणू शांतवते.. हृदयातील आर्तता तेव्हा, मशाल होऊनी उजळते..मशाल होऊनी उजळते...इति हेमा उवाच ©️ सौ.हेमा पाटील. दिनांक 7/5/2024

रिती ओंजळ

 #रिती ओंजळ     ©️ सौ.हेमा पाटील. "जी में आता हैं तेरे दामन में सर छुपाके हम रोते रहे..रोते रहे तेरे भी आखोंमे आसूंओंकी नमी तो नहीं.... तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी तो नहीं...जिंदगी नहीं.. जिंदगी नहीं" | लीना खूप अस्वस्थ होती.तिला आर्यनची खूप आठवण येत होती.आत्ता मोबाईल उचलावा आणि आर्यनला फोन करावा असे प्रकर्षाने वाटून तिने दोनदा मोबाईल उचलला पण होता आणि हताश होऊन परत टेबलवर ठेवला होता.आर्यन आपला फोन उचलेल की नाही याबाबत ती साशंक होती.आजवर आर्यनसोबत घालवलेले  क्षण तिच्या मनात फेर धरत होते.एकामागून एक आठवणी पावसाच्या सरींसारख्या मनावर कोसळत होत्या.आणि त्यात न्हाऊन निघाल्यावर मन शांतवण्याऐवजी अधिकच अस्वस्थ झाले होते.आर्यनचा दुरावा साहवत नव्हता.आत्ता या क्षणी मर्यादेच्या सगळ्या बेड्या काढून फेकून द्याव्यात आणि अधिरपणे धावतच आर्यनकडे जावे व त्याच्या मिठीत शिरावे ही इच्छा प्रबळपणे मनात दाटून येत होती...आत्ता याक्षणी मला जगातील इतर कोणतेही सुख नको आहे..त्याच्या आश्वस्त बाहुपाशांचा विळखा हाच माझ्यासाठी याक्षणी माझी सर्वात महत्त्वाची गरज आहे.मला त्याच्याकडून काहीही म...

झुमका गिरा रे...

 झुमका गिरा रे... सकाळी रेवती गडबडीने आंघोळ करून स्वयंपाकघरात आली, तेव्हा सासुबाई चुलीवर चहाचे आधण चढवत होत्या.तीने जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला व शेजारी बसली. या घराचा नियमच होता, सकाळी आंघोळ करून आले की, सर्व लहाना़ंनी घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करायचा,मगच कामाला लागायचे.रेवती नवी नवरी होती,पण कालच आज्जेसासुबाईंनी तिला घराच्या रीतीभातींबाबत सांगितले होते.त्यामुळे तिने समोर दिसलेल्या सासुबाईंना नमस्कार केला होता. सासुबाईंनी दोघींपुरता चहा एका छोट्या पातेल्यात काढला व त्यात दूध घालून उकळी आली की कपबशीत गाळला.रेवतीने चहाचा कप उचलला अन् ती पिऊ लागली.एवढ्यात सासुबाईंचे तिच्याकडे लक्ष गेले,अन् त्या उद्गारल्या,अगं तुझे कानातले कुठाय? त्याबरोबर तिने आपल्या दोन्ही कानांना हात लावला.डाव्या कानातील झुमका कानात नव्हता.चहा तिथेच ठेऊन ती उठली व न्हाणीघरात आली.तिथे सगळीकडे शोधले.अ़ंगपुसणीला अडकलाय का ते ही पाहिले,पण तिथे सापडला नाही.मग ती शोधत शोधत स्वयंपाकघरात परत आली,पण तिथेही कुठे सापडला नाही.तेवढ्यात स्वयंपाकघरात एकेक करत सगळेजण गोळा झाले होते.सासरे, आज्जेसासुबाई,नणंदा , दीर . झुमका मरु...