माझे बाबा
आजचा अनुभव...
सकाळी ध्यानाला बसले होते..बाबांची मूर्ती डोळ्यासमोर होती.बाबा म्हणाले, झाले का समाधान? आता आणखी काय ..यानंतर अजून काय..अजून काय ? यावर मी हसले.झाले समाधान बाबा.. तुम्ही सोबत आहात आणि कायमच सोबत रहा हीच अपेक्षा.. बाकीचे सगळे मिथ्य्या आहे हे समजलेले आहेच बाबा! पण तरीही या धारण केलेल्या मनुष्य देहालाही न्याय मिळायला हवा ना...खरं सांगू बाबा, त्या परिपूर्णतेच्या, मानवी इच्छा आकांक्षांच्या पूर्तीच्या वेळीही तुम्हीच आठवता. कारण सुरवात तर तुमच्यापासूनच झाली आहे. तुमची इच्छा नसेल तर झाडाचे पानही हलत नाही,मग बाकीचे काय सांगू...
तुम्ही आहात... फक्त समाधीस्थळीच नाही , तर पूर्वी देहात असताना जसे सगळीकडे भ्रमण करायचात तसेच आजही करता.सगळीकडे तुम्ही आहात... फक्त तुमचे अस्तित्व ज्याला जाणवले तो भाग्यवान! अर्थात तुमचे अस्तित्व जाणवले नाही म्हणून भक्तांचे काही बिघडत नाही, तुम्ही आपल्या भक्तांवर अगदी बारकाईने लक्ष ठेवून असता.धनकवडीला जरी भक्त भेटायला आला नाही तरीही तुम्ही रागवत नाही, तुम्ही भक्तांची अडचण समजून घेता.उगाच तुमच्या चरणांशी लीन झालेला भक्त माझे बाबा अशी आर्त स्वरात साद घालत नाही...कारण तुम्ही कायम सोबत आहात याची त्याला खात्री असते.तुम्ही समाधिस्थ आहात पण देह सोडून गेल्यावर तर तुमच्यावर कसलेच बंधन उरले नाही,अर्थातच आधीही ते नव्हतेच म्हणा! एकाच वेळी अनेक ठिकाणी भक्तांना दर्शन देतच होतात. तुम्ही माझे आहात आणि तुमच्या छत्रछायेखाली आपण आहोत ही भावनाच पुरेशी आहे.. यापेक्षा अधिक काय हवे? सौ.हेमा पाटील.
Comments
Post a Comment