Posts

Showing posts from August, 2024

डोह

   डोह ©️सौ. हेमा पाटील.     मे महिन्याची सुट्टी लागली आणि मनोजला गावी जाण्याचे वेध लागले.यंदा काॅलेजचे लास्ट ईयर असल्याने ही शेवटची सुट्टी गावी मनमुरादपणे उपभोगायची असे ठरवून त्याचे कालपासूनच पॅकींग सुरु होते.  कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच उत्तम कंपनीत चांगल्या पॅकेज वर सिलेक्शन झाल्याने तो एकदम रिलॅक्स होता. रिझल्ट लागला की कंपनीकडून जाॅईनिंगचे लेटर येणार होते. तोपर्यंत सुट्टीच सुट्टी...     सकाळच्या बसने तो निघाला पण..! कधी एकदा गावाला जातोय अन मस्तपैकी शिवारात हुंदडतोय असे त्याला झाले होते.    घरी आला तर अण्णा आजोबा सोप्यातच झोपाळ्यावर बसून शेंगा व चुलीतल्या आरावर भाजलेल्या भातवड्या खात बसले होते. त्याला पाहून त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहराभर पसरला. त्याकडे प्रेमाने पहात फ्रेश व्हायला तो आत गेला. हातपाय धुवून बाहेर आला व सर्वांच्या पाया पडला. तोपर्यंत तो आल्याची बातमी वाड्यात पसरली होतीच, व घरी असलेले सगळेजण सोप्यात जमा झालेच होते. मग काय विचारता.. आजोबांसोबत भातवड्या शेंगा खात खात सर्वांशी गप्पा सुरु झाल्या. तोपर्यंत काकीने चहा करुन आण...

स्वेटर

 स्वेटर ©® सौ.हेमा पाटील. माहेरी गेलेल्या मुग्धाची सामानाची आवराआवर चालली होती.मुलांना सुट्टी लागल्यामुळे ती दिवाळीत भाऊबीजेदिवशी माहेरी आली होती.त्यानंतर जाते रहाते करत सर्वांच्या आग्रहाला बळी पडत तब्बल बारा दिवस राहिली होती.तिला शिक्षिका असल्याने शाळेला सुट्टी होती म्हणून रहाणे जमले होते.  पण आता परवापासून शाळा सुरु होणार होती म्हणून मुक्काम आवरता घ्यावा लागणार होता.त्याचीच भराभरी चालली होती.आई किचनमध्ये ताजी दिवाळी बनवत होती मुलीला सोबत बांधून देण्यासाठी..आणि मुग्धाचे सामाना सोबतच माहेरच्या आठवणी ही बांधायचे काम सुरू होते. सामान बांधायचे काम हाताने सुरु होते आणि स्मृती बांधण्याचे मनाने... सगळे बांधून हातावेगळे झाले..आईचे ही स्वयंपाकघरातील काम उरकले.मग दोघी मायलेकीच्या गप्पा सुरू झाल्या. आईचा उपदेश करून झाला. तिचे आईला काळजी घे सांगून झाले.दोघीही आपापल्या अंथरुणावर पडल्या.पण दोघीही रात्रभर जाग्याच होत्या. काळजाचा तुकडा नांदायला जाणार, आता परत कधी रहायला येणार अशी चुटपुट आईला लागून राहिली होती.आणि आता माहेरी विसावायला कधी येता येईल असा विचार लेकीच्या मनात घोळत होता. सकाळी दा...

नियती भाग १

 नियती   आजपासून ही कथा सहा भागांमध्ये पोस्ट करणार आहे.आजचा पहिला भाग ...     ©® सौ.हेमा पाटील.   “हो.. खूप मिस करतेय मी तुला! मला कळतेय पण वळत नाही.तुझ्यावर इतका जीव लागलाय की आता  तिथून परतीचा मार्गच मला दिसत नाही.तू..तू..आणि फक्त तूच हेच माझे जग बनलेय! तुला वगळून एकाही गोष्टींचा विचार मी करु शकत नाही.सकाळी उठताना तुझ्याच फोटोकडे पाहून तुला शुभ सकाळ म्हणते व कल्पनेनेच अंगावर मऊ दुलई घेऊन शांतपणे झोपलेल्या तुला पहाते, तुझ्या चेहऱ्यावर असलेले तृप्ततेचे भाव पहाते आणि मी माझा दिवस सुरू करते”...शरु रोजच्याप्रमाणे फोटोतील अभिजितशी बोलत होती.वाॅटसअप नंबरवर असलेला अभिजितचा फोटो ती रोज जेव्हा जेव्हा त्याची आठवण येईल तेव्हा तेव्हा पहायची, फोटोतील त्याच्याशी आपल्या मनातील गुजगोष्टी करायची... एकांतात!  अभिजित हा तिचा बालमित्र! दोघेही बालपणी एकाच वर्गात होते.शेजारीच रहात असल्याने एकमेकांच्या घरी जाणे येणे होतेच. शाळेतून घरी आल्यावर कसेतरी चार घास पोटात ढकलायचे आणि सगळा बालचमू हळूहळू एकत्र जमायचा.कधी पत्त्यांचा डाव जमायचा, कधी लगोरी,कधी खो खो रंगात यायचा तर कधी कब...

सेलिब्रेशन

 #सेलिब्रेशन ©® सौ.हेमा पाटील.    ‌"ऐ..अगं थांब ना जरा".. "नाही गं बाई! आज तर शक्यच नाही". "का गं? आज काय विशेष आहे"? "अगं आज सुजितचा वाढदिवस आहे". "हो का? छान छान! पण जाण्यापूर्वी एक सांग, तुझ्या लक्षात होती वाढदिवसाची तारीख"? "म्हणजे काय? घरातील सगळ्यांच्या वाढदिवसाच्या तारखा माझ्या तोंडपाठ आहेत". "आणि तुझा वाढदिवस कुणाकुणाच्या लक्षात असतो"? यावर विचारात पडत ती उद्गारली,  "फेसबुक आठवण करुन देते म्हणून फ्रेंडलिस्टमधील कुणीतरी शुभेच्छा देते आणि ती पोस्ट व्हायरल होत होत घरापर्यंत पोहोचते.तेव्हा सगळ्यांच्या लक्षात येते". "म्हणजेच कुणाच्या लक्षात नसते". "नसेना का! सध्या किती धावपळीचे जीवन झाले आहे.काय काय लक्षात ठेवायचे अन् कधी! त्यामुळे मी वाईट वाटून घेत नाही.कधी कधी तर माझा वाढदिवस होऊनही जातो पण कुणाच्या गावीही नसते". "असं कसं..असं कसं ! आपल्या माणसांचा वाढदिवस लक्षात असू नये? निदान नवराबायकोंनी तरी एकमेकांचे वाढदिवस लक्षात ठेवलेच पाहिजेत.आपल्या अर्धांगाचा वाढदिवस जर लक्षात रहात नसे...

जेटलॅग

 जेटलॅग ©® सौ.हेमा पाटील. "ऐ मम्मी...डाळ चांगली झाली आहे ना"? "हो गं".  "मग खात का नाहीयेस? तशीच वाटी भरलेली आहे. मग भाजी हवी आहे का ? वाढू का"? "नको." पुढ्यात आलेल्या ताटातील आपण काय खातोय तेच तिला समजत नव्हते.पोळीचा तुकडा मोडून यांत्रिकपणे तो तोंडाकडे जात आहे एवढेच तिला समजत होते.ताटातील,भाजी, आमटी एवढेच काय पोळीची चव ही तिला समजत नव्हती.सर्वांसोबत बसून तिने ताटातील सर्व पदार्थ संपवले व ती तशीच ताटावर बसून राहिली... सगळे उठले तशी ती ही यांत्रिकपणे उठली व सोफ्यावर येऊन बसली. "ती " दुसरी तिसरी कुणी नसून मीच होते.ही माझीच गोष्ट आहे.    कॅनडा स्थित जावई ,मुलगी खूप वर्षे बोलावत होते, शेवटी आत्ता तो योग जुळून आला होता व आम्ही  सातासमुद्रापार पोहोचलो होतो. विमानाचा हाॅल्ट धरता चोवीस तास प्रवास करुन गेल्यावर साहजिकच थकल्याने झोपणे अनिवार्य होते.पण नंतर ही झोपच खेळ खंडोबा मांडणार आहे हे तेव्हा समजले नव्हते. भारतात दिवस आणि त्यावेळी तिकडे रात्र..हे वेळेतील बदलाचे गणित पचवायला शरीराला त्रास होतो हे ऐकून होते. पण या चक्रात मी चांगलीच अडकेन असे वा...

रक्षाबंधन

 #रक्षाबंधन  सौ.हेमा पाटील  समोरच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिसदादाने जोरात दोनदा शिट्टी फुंकली अन् हाताने इशारा करत तिला गाडी बाजूला घ्यायला सांगितले.    रस्त्यावर गाडी चालवत असताना मागून ,पुढून ,शेजारुन कुठल्याही गाडीने कितीही हाॅर्न दिला तरी कधीही गाडी जागेवरुन तसूभरही बाजूला न घेणार्या तिला आता मात्र पाय टेकवत स्कूटी साईडला घ्यावी लागली. शिपाईदादा जवळ आले.. "काय मॅडम.. रस्त्यावर नियम पाळून गाडी चालवायची असते"... "हो दादा..हे काय मी हेल्मेट घातलेय की".. "अहो मॅडम"... पण त्यांना पुढे बोलू न देता ती म्हणाली,"अन् गाडीवर तर मी एकटीच आहे..टिबल सीट कुठे चालले होते".. यावेळी तिच्याकडे आपादमस्तक पहात पोलिस दादा उद्गारले... "बघा.. म्हणजे आपल्याला रस्त्यावरचे नियम पण आम्हीच शिकवायचे का" ? "नाही नाही दादा..! मी अगदी परीक्षा देऊन लायसन्स काढलेय..थांबा दाखवते". "ते नंतर दाखवा‌..आधी मला सांगा,एवढी कसली घाई झाली आहे तुम्हाला"? "काय सांगू तुम्हाला दादा , आम्हां बायकांचा कुणी विचारच करत नाही. अहो बघा ना,आज रक्षाबंधन ...

वर्षाव शुभेच्छांचा

  शुभेच्छांचा वर्षाव    या शुभेच्छा देणारांचे पण मला विशेषच वाटते. कशाच्याही काय शुभेच्छा द्यायच्या राव ? बेंदूर या सणाच्या शुभेच्छा? आपण काय बैल आहोत का? तसे बघितले तर बैलासारखे आपणही स्वतःला घाण्याला जोडून घेतलेच आहे म्हणा ! पण आपल्यासाठी वेगळे सण असतात ना! Father's Day ! Engineer's Day ! Doctor's Day !  मग बेंदराच्या शुभेच्छा कशासाठी? तो दिवस ज्यांच्यासाठी आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा.आजकाल खेडेगावात पण अख्ख्या गावात मोजून पंचवीस तीस बैल असतील.सगळी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जातात. मग शहरात बसून बेंदराच्या शुभेच्छा का द्यायच्या? त्याऐवजी  शहरात राहणाऱ्या नवीन पीढीला बैल करत असलेल्या शारीरिक कष्टांबाबत माहीती करुन द्या.शेतीतील त्यांचे योगदान समजून सांगा. अन्न वाया का घालवू नये ते शिकवा. खरं तर बेंदूर या सणाला मुळावर आलेला सण म्हणतात. खेड्यात आजही बाकी कुठल्या सणाला पुरणपोळी केली नाही तरी एकवेळ चालते पण या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य देवाला हवाच! आषाढी एकादशी.. शुभेच्छा! गुरुपौर्णिमा... शुभेच्छा! आषाढी अमावस्या उर्फ गटारी अमावस्या... शुभेच्छ...